ही अक्षरं नाहीत,
हे शब्द नाहीत,
या कविता नाहीत.

मौनातून उसळून
मौनात विसर्जित होण्यापूर्वी
मध्यसीमेवर अस्तित्वभान देत
निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची
स्मारकं आहेत ही

उभ्या आडव्या रेषा
काही बिंदू , काही वळणं
आणि बरंचसं अवकाश
यांनी घडवलेली !